सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यास रक्षक प्रतिष्ठान कायम तत्पर राहील – संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोझर

उडतरे (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क), ता. वाई:
सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्यासाठी रक्षक प्रतिष्ठान कायम कटिबद्ध असेल, असा विश्वास रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोझर यांनी व्यक्त केला.
वाई तालुक्यातील उडतरे येथे रविवार दिनांक २ रोजी रक्षक प्रतिष्ठानच्या शाखा उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
प्रमुख उद्दिष्ट्ये आणि मार्गदर्शन
सुशील मोझर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्य करत आहोत.”सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नोकरी मिळवून देण्याचे काम करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असून, समाजातील गरजू लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सदैव तत्पर राहिले पाहिजे.”त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
या शाखा उद्घाटन समारंभास रक्षक प्रतिष्ठानचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने सातारा जिल्हाध्यक्ष दस्तगीरभाई बागवान, मनोज भाऊ माळी, सातारा शहराध्यक्ष महेश भाऊ ठोंबरे, तन्वीर शेख, सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल पवार, सातारा जिल्हा संघटक सुशील जाधव यांचा समावेश होता.तसेच, उडतरे येथील नूतन शाखाप्रमुख अथर्व पवार, उपाध्यक्ष संकेत पवार, विघ्नेश पवार, संदेश पवार, स्वप्नील पवार, दत्तात्रय पवार, शैलेश बाबर, रूपेश जगताप, प्रज्वल बाबर, तसेच प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उडतरे शाखेच्या माध्यमातून आता परिसरातील युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.
